Sunday, October 4, 2015

लहान मुले आणि कुपोषण

  भारता मध्ये उपासमारीची समस्या जेणेकरून लहान मुल आणि मुली यांना भेडसावत आहे भारताचा लोकसंखेच्या तुलनेत दुसरा क्रमांक लागतो व भारतात तरुणांचे प्रमाण जास्त आहे तरुणांची संख्या जरी जास्त असली तरी पोषक आहाराच्या अभावी होणारे उपोषण ही भारतातील गंभीर समस्या आहे .शरीरासाठी उर्जेची गरज असते आणि विविध पदार्था पासून  शरीराला  उर्जा मिळते।
व ऊर्जेमुळे आपले शरीर हालचाल करते . रोजच्या आहारामध्ये पिष्टमय पदार्थ आवश्यक असतात .पिष्टमय पदार्था मध्ये विविध शर्करा , तंतुमय पदार्थ याचा समावेश असतो तांदूळ, गहू , मका , बाजरी ,ज्वारी ही तृण धान्ये आहेत .त्याच बरोबर प्रथिने सिघ्न पदार्थ यांचीही शरीराला गरज असते .सर्व पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्याचे ग्लुकोज मध्ये रुपांतर होते व ग्लुकोज रक्त मार्फत संपूर्ण शरीरात पुरवले जाते वरील तृण धान्याची शरीराला गरज असतानाही ते पुरेश्या प्रमाणात मिळत नाही उर्जा न मिळाल्या मुले लहान मुलामुलींची शारीरिक वाढ खुंटते वाढत्या वयासाठी शरीराला पोषक आहाराची गरज असते आणि ते नमिळाल्यास शारीरिक वाढी बरोबर विकास ही खुंटतो पोषक आहार मिळत नाही या साठी पर्याय म्हणून लहान मुल जंग फूड कडे वळतात आणि जंग फूड त्याच्या शरीरावर परिणाम होतो जंग फूड मध्ये पोषकता नसते . ते खाल्या मुले मुलांचा मानसिक विकास चंग होत नाही . शालेय मुलांमध्ये जंग फूड चे प्रमाण जास्त असते विक्रेते खाद्य पदार्थ विकतात पण त्या मध्ये स्वच्छता नसते परिणामी लहान मुलांना विविध आजार जडतात .मुळातच अन्नाची कमतरता आणि वाढलेल्या महागाई मुले जंग फूड कडे पर्याय म्हणून पहिले जाते ..भारतामध्ये  हवामानाच्या आधारावर शेती केली जाते शहरी भागातली परिस्तिथी सोडल्यास ग्रामीण भागात शेती केली जाते पावसाळाच्या अभावामुळे पिक येत नाही परिणामी कुपोषण होते २०१४ च्या आकडेवारी नुसार २.३ टक्के मुल कुपोषणाला बळी पडत आहेत त्याच बरोबर भारताचा लोकसंखेच्या तुलनेत दुसरा क्रमांक आहे  आणि तरुणांचे प्रमाण ही  जास्त आहे.तरुणांची संख्या जरी जास्त असली तरी मुल मुलींचे पोषक आहाराच्या अभावी होणारे उपोषण ही भातातली एक गंभीर समस्या आहे ..

No comments:

Post a Comment